पर्थ – अननुभवी संयुक्त अरब अमिरातीला (यूएई) हरवत भारताने विश्वचषकातील सलग तिसरा विजय नोंदवला. अर्ध्या दिवसात संपलेल्या लढतीत महेंद्रसिंग धोनी आणि सहका-यांनी वर्चस्व राखले.
मात्र प्रतिस्पर्ध्यानी निराशा केल्याने लढत एकतर्फी झाली. गतविजेत्यांनी ९ विकेट आणि १८७ चेंडू (३१.१ षटके) इतक्या मोठय़ा फरकाने जिंकताना ‘ब’ गटातील अव्वल स्थान आणखी भक्कम केले. तसेच बाद फेरीसाठीची दावेदारी अधिक मजबूत केली.
पर्थच्या (वाका) खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज वर्चस्व राखतील, असे वाटले. मात्र फिरकीपटूंना अधिक यश मिळाले. भुवनेश्वर कुमार (१ विकेट) आणि उमेश यादव (२ विकेट) या मध्यमगती दुकलीच्या प्रभावी मा-यानंतर अनुभवी ऑफस्पिनर आर. अश्विनने (१०-१-२५-४) अप्रतिम मारा करत विश्वचषकच नव्हे तर वनडे कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट वैयक्तिक कामगिरीची नोंद केली.
त्याला डावखु-या रवींद्र जडेजाची (२३-२) चांगली साथ लाभली. भारताच्या गोलंदाजी अचूक आणि टिच्चून मारा केलाच. मात्र यूएईच्या फलंदाजांनी निराशा केली. त्यांचे आघाडीचे फलंदाज चुकीचे फटके मारून बाद झाले. निम्मा संघ ४४ धावांत परतल्यानंतर यूएईचे धावांचे ‘शतक’ पूर्ण होण्याबाबत साशंकता होती.
मात्र शायमन अन्वरने (३५) तळातील असांका गुरुगेसह (नाबाद १०) शेवटच्या विकेटसाठी ३१ धावांची भागीदारी करताना संघाला शतकी मजल गाठून दिली. अन्वरची खेळी यूएईतर्फे सर्वाधिक वैयक्तिक खेळी ठरली. तसेच त्याने गुरुगेसह केलेली भागीदारी डावातील सर्वोच्च ठरली.
गोलंदाजांनी विजय नक्की केल्याने १०३ धावांचे आव्हान म्हणजे केवळ सोपस्कार होते. डावखुरा सलामीवीर शिखर धवनच्या (१४) बदल्यात १८.५ षटकात भारताने विजयी लक्ष्य पार केले. अन्य सलामीवीर रोहित शर्मा (५५ चेंडूंत नाबाद ५७ धावा) आणि ‘वनडाउन’ विराट कोहलीने (४१ चेंडूंत नाबाद ३३ धावा) दुस-या विकेटसाठी नाबाद ७५ धावांची भागीदारी करताना २० षटकांच्या आतच विजय साकारला.
रोहितने यंदाच्या विश्वचषकातील पहिले आणि वनडेतील २४वे अर्धशतक झळकावताना १० चौकार आणि एक षटकार लगावला. कोहलीने ५ चौकार मारले. फलंदाजांनी निराशा केली तरी यूएईच्या गोलंदाजांनी भारताची एक विकेट घेतली. तसेच एकही अवांतर धाव दिली नाही.
सलग तिस-या विजयामुळे भारताने १२ गुणांसह ‘ब’ गटातील अव्वल स्थान अधिक मजबूत केले. भारताच्या आणखी तीन लढती (वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे आणि आर्यलड) शिल्लक आहे. गटवार साखळीतील चौथ्या लढतीत शुक्रवारी (६ मार्च) पर्थवरच भारत विंडिजशी झुंजेल.
धावफलक
यूएई – अमजद अली झे. धोनी गो. भुवनेश्वर ४, आंद्री बेरेंगर झे. धोनी गो. उमेश ४, कृष्णचंद्रन झे. रैना गो. अश्विन ४, खुर्रम खान झे. रैना गो. अश्विन १४, स्वप्नील पाटील झे. धवन गो. अश्विन ७, शायमन अन्वर त्रि. गो. उमेश ३५, रोहन मुस्तफा पायचीत गो. मोहित २, अमजद जावेद झे. रैना गो. जडेजा २, मोहम्मद नाविद त्रि. गो. अश्विन ६, मोहम्मद तौकीर त्रि. गो. जडेजा १, मंजुला गुरुगे नाबाद १०, अवांतर – १३ धावा (लेगबाईज ४, वाईड ९), एकूण – ३१.३ षटकांत सर्वबाद १०२
बादक्रम : १-७ (बेरेंगर), २-१३ (अमजाद), ३-२८ (कृष्णचंद्रन), ४-४१ (स्वप्नील पाटील), ५-४४ (खुर्रम), ६-५२ (मुस्तफा), ७-६१ (जावेद), ८-६८ (नवीद), ९-७१ (तौकीर), १०-१०२ (अन्वर)
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ५-०-१९-१, उमेश यादव ६.३-२-१५-२, रविचंद्रन अश्विन १०-१-२५-४, मोहित शर्मा ५-१-१६-१, रवींद्र जडेजा ५-०-२३-२
भारत – रोहित शर्मा नाबाद ५७, शिखर धवन झे. मुस्तफा गो. नाविद १४, विराट कोहली नाबाद ३३, अवांतर – ०. एकूण – १८.५ षटकांत १ बाद १०४.
बादक्रम : १-२९ (धवन).
गोलंदाजी – मोहम्मद नाविद ५-०-३५-१, मंजुला गुरुगे ६-१-१९-०, अमजद जावेद २-०-१२-०, कृष्णचंद्रन ३-०-१७-०, मोहम्मद तौकीर २.५-०-२१-०
निकाल : भारत ९ विकेटनी विजयी.
मात्र प्रतिस्पर्ध्यानी निराशा केल्याने लढत एकतर्फी झाली. गतविजेत्यांनी ९ विकेट आणि १८७ चेंडू (३१.१ षटके) इतक्या मोठय़ा फरकाने जिंकताना ‘ब’ गटातील अव्वल स्थान आणखी भक्कम केले. तसेच बाद फेरीसाठीची दावेदारी अधिक मजबूत केली.
पर्थच्या (वाका) खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज वर्चस्व राखतील, असे वाटले. मात्र फिरकीपटूंना अधिक यश मिळाले. भुवनेश्वर कुमार (१ विकेट) आणि उमेश यादव (२ विकेट) या मध्यमगती दुकलीच्या प्रभावी मा-यानंतर अनुभवी ऑफस्पिनर आर. अश्विनने (१०-१-२५-४) अप्रतिम मारा करत विश्वचषकच नव्हे तर वनडे कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट वैयक्तिक कामगिरीची नोंद केली.
त्याला डावखु-या रवींद्र जडेजाची (२३-२) चांगली साथ लाभली. भारताच्या गोलंदाजी अचूक आणि टिच्चून मारा केलाच. मात्र यूएईच्या फलंदाजांनी निराशा केली. त्यांचे आघाडीचे फलंदाज चुकीचे फटके मारून बाद झाले. निम्मा संघ ४४ धावांत परतल्यानंतर यूएईचे धावांचे ‘शतक’ पूर्ण होण्याबाबत साशंकता होती.
मात्र शायमन अन्वरने (३५) तळातील असांका गुरुगेसह (नाबाद १०) शेवटच्या विकेटसाठी ३१ धावांची भागीदारी करताना संघाला शतकी मजल गाठून दिली. अन्वरची खेळी यूएईतर्फे सर्वाधिक वैयक्तिक खेळी ठरली. तसेच त्याने गुरुगेसह केलेली भागीदारी डावातील सर्वोच्च ठरली.
गोलंदाजांनी विजय नक्की केल्याने १०३ धावांचे आव्हान म्हणजे केवळ सोपस्कार होते. डावखुरा सलामीवीर शिखर धवनच्या (१४) बदल्यात १८.५ षटकात भारताने विजयी लक्ष्य पार केले. अन्य सलामीवीर रोहित शर्मा (५५ चेंडूंत नाबाद ५७ धावा) आणि ‘वनडाउन’ विराट कोहलीने (४१ चेंडूंत नाबाद ३३ धावा) दुस-या विकेटसाठी नाबाद ७५ धावांची भागीदारी करताना २० षटकांच्या आतच विजय साकारला.
रोहितने यंदाच्या विश्वचषकातील पहिले आणि वनडेतील २४वे अर्धशतक झळकावताना १० चौकार आणि एक षटकार लगावला. कोहलीने ५ चौकार मारले. फलंदाजांनी निराशा केली तरी यूएईच्या गोलंदाजांनी भारताची एक विकेट घेतली. तसेच एकही अवांतर धाव दिली नाही.
सलग तिस-या विजयामुळे भारताने १२ गुणांसह ‘ब’ गटातील अव्वल स्थान अधिक मजबूत केले. भारताच्या आणखी तीन लढती (वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे आणि आर्यलड) शिल्लक आहे. गटवार साखळीतील चौथ्या लढतीत शुक्रवारी (६ मार्च) पर्थवरच भारत विंडिजशी झुंजेल.
धावफलक
यूएई – अमजद अली झे. धोनी गो. भुवनेश्वर ४, आंद्री बेरेंगर झे. धोनी गो. उमेश ४, कृष्णचंद्रन झे. रैना गो. अश्विन ४, खुर्रम खान झे. रैना गो. अश्विन १४, स्वप्नील पाटील झे. धवन गो. अश्विन ७, शायमन अन्वर त्रि. गो. उमेश ३५, रोहन मुस्तफा पायचीत गो. मोहित २, अमजद जावेद झे. रैना गो. जडेजा २, मोहम्मद नाविद त्रि. गो. अश्विन ६, मोहम्मद तौकीर त्रि. गो. जडेजा १, मंजुला गुरुगे नाबाद १०, अवांतर – १३ धावा (लेगबाईज ४, वाईड ९), एकूण – ३१.३ षटकांत सर्वबाद १०२
बादक्रम : १-७ (बेरेंगर), २-१३ (अमजाद), ३-२८ (कृष्णचंद्रन), ४-४१ (स्वप्नील पाटील), ५-४४ (खुर्रम), ६-५२ (मुस्तफा), ७-६१ (जावेद), ८-६८ (नवीद), ९-७१ (तौकीर), १०-१०२ (अन्वर)
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ५-०-१९-१, उमेश यादव ६.३-२-१५-२, रविचंद्रन अश्विन १०-१-२५-४, मोहित शर्मा ५-१-१६-१, रवींद्र जडेजा ५-०-२३-२
भारत – रोहित शर्मा नाबाद ५७, शिखर धवन झे. मुस्तफा गो. नाविद १४, विराट कोहली नाबाद ३३, अवांतर – ०. एकूण – १८.५ षटकांत १ बाद १०४.
बादक्रम : १-२९ (धवन).
गोलंदाजी – मोहम्मद नाविद ५-०-३५-१, मंजुला गुरुगे ६-१-१९-०, अमजद जावेद २-०-१२-०, कृष्णचंद्रन ३-०-१७-०, मोहम्मद तौकीर २.५-०-२१-०
निकाल : भारत ९ विकेटनी विजयी.

Post a Comment