0
माहूर (नांदेड), दि. २३ – दलीत जनतेचे आर्थीक सक्ष्मीकरणासाठी जमीन सुधारणा गरजेचे आहे. दलीत मुस्लीमांना व्होट बँक म्हणून वापर करनारे भांडवली पक्ष, धर्म जातीच्या नावावर द्वेशाचे राजकारण करून अमानुष पद्घतीने विषमतेची बीजे पेरून एकमेकांना झुंजत ठेवले. वैचारीक स्त्रोत असलेले डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे सारख्या पुरोगामी व वैज्ञानिक दृष्टीकोणान ठेवणाºयाचा काटा काढण्यात आला. या वैचारीक लढाईत बहुजनांची, शोषीत वंचीतांचा अभेद्य एकजुट उभारने अत्यंत गरजेचे असतांना काही दलीत नेत्यांचा संधीसाधुपणाच दलीत राजकारणाºया अद्य:पतनाचा कळस ठरल्याची खंत स्वागताध्यक्ष कॉ. मनोज किर्तने यांनी व्यक्त केली.
बौद्घभूमि परीसर माहूर येथे आयोजीत बौद्घ धम्म परिषदेच्या समारोप प्रसंगी कॉ. किर्तने बोलत होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड म्हणाले की, माहूर येथे बौद्घस्तूप बांधण्यासाठी बौद्घभूमि परीसराचा पर्यटन बहृत आराखड्यात समावेश झाला आहे. शासनास माहुर गड विकास प्राधीकरणाकडून तीन कोटीचा आराखडा १४ मार्च २०१४ ला सादर केल्याचे ते म्हणाले. समारोपीय कार्यक्रमात ‘मला चिड येत नाही हा माझा गुन्हा, दोष देऊ कुणा’ या वामन दादा कर्डक यांनी लिहलेल्या गिता बरोबर वादळ वारा सारख्या भीम गिते सादर करून प्रसिद्घ कवी, गायक अनिरूद्घ वनकर यांनी श्रोत्यांना तीन तास खिळवून ठेवले. तसेच कविसंमेलनात मराठवाडा-विदर्भातील नामवंत कवीनी रचना सादर केल्यास. अध्यक्षस्थानी अ‍ॅड.के.के. सावळे यांनी केले. संचालन कादर दोसानी यांनी, प्रा. विनोद कांबळे, आकाश कांबळे यांनी केले. यावेळी कवि व कलाकाराचे स्वागत निमंत्रक गोविंद मगरे यांनी केले. यावेळी संयोजन समितीचे सदस्य, माहूर तालुका संभाजी ब्रिगेड, डीवायएफचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

 
Top